Sunday 2 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ५ ...

प्रकाशकाचे हृद्गत 
विश्वसेवक 
प्रकाशानंद चैतन्य

' सद्गुरुचरणी , दंडवत असो, l
प्रेम सदा वसो चित्ती माझ्या ' ll (सर्वांगयोग  १-१ )
यावरी 'भक्ती'चे पीक उगवते ;  l
'अकर्म' द्वारे ते दिसू लागे ll (सर्वांगयोग  ८-१ )

प्रस्तुत 'उदार कल्पतरू' नामक , विज्ञानाचार्य श्री दी.या. मार्डीकर लिखित , सिद्धाचार्य श्री सर्वांगानंद चैतन्य (पुर्वाश्रमीचे डॉ.पुं.ह.संत) यांचे जीवन चरित्र जनता जनार्दनाचे सेवेत प्रकाशित करण्यात मला अतीव आनंद होत आहे. वर उद्घृत केलेल्या अभंगानुसार सद्गुरू व सत् शिष्य यांचे अनन्य प्रेम संबंधातून परिपक्व झालेले हे भक्तीरसाचे पीकच प्रगट झाले आहे , असे म्हणणे सार्थ होईल.

भाग्वद्गीतेसारखा दिव्यचक्षुजान्यअनुभवमूलक अप्रतिम सिद्धान्तिक ग्रंथ लिहूनसुद्धा श्री व्यासजींना आत्मशान्त्यार्थ आपले सद्गुरू श्रीकृष्ण यांचे चरीत्रवर्णन करण्याची आवश्यकता भासून 'भागवत' ग्रंथाची निर्मिती झाली. तत्वतः तश्याच प्रेरणेची हा चरित्रग्रंथ फलश्रुतीच होय.

भग्वदकृपेने या अनुक्रमे नर-नारायण बीजधारण करणाऱ्या दिव्य विभूतींचा व माझा , ह्यांनी दिव्यदृष्टीचा अनुभव ग्रहण केल्यापासून अर्थात वीस-पंचवीस वर्षांचा निकट संबंध असल्याने हे 'प्रकाशकाचे हृद्गत' देण्याचे कार्य माझेकडे आले आहे ते यथामती पार पाडण्याचा हा प्रयत्न आहे.

श्री सर्वान्गानान्द्जी हे जीवनचरित्र छापून प्रसिद्ध करण्याविषयी एका पत्रात म्हणतात , -
"आमच्या दृष्टीने ह्या घटनेस मुळीच किंमत नाही. पूर्वी झालेली, होत असलेली व भविष्यात होऊ शकणारी विश्वरूपाची सेवा यालाच आम्ही जीवन चरित्र समजतो. हे सर्व चरित्र भगवंताचेच असून करता करविता सद्गुरूच आहे. ही आमची अटल धारणा. परंतु भक्तांचे लाड पुरविणे कधी कधी क्रमप्राप्त होते , म्हंणून आम्ही या कार्यास अनुमती दिली."

सद्गुरुस्वरूप व्यक्तीची ही धारणा व प्रेरणा , यथार्थ असून हा चिरस्थायी भाव आहे , हे भक्त जाणतो. तथापि परम्काल्यानाचा मार्गदर्शन करणाऱ्या सद्गुरुन्विषयी त्यास कृतकृत्यता वाटून जीवन चरित्र लिहिण्याची क्वचित याप्रमाणे स्फूर्ती होणे हेसुद्धा स्वाभाविकच आहे, हे मानवी जीवनाचा आध्यात्मिक इतिहास पाहिल्यास स्पष्ट होईल. अश्याप्रकारचे चरित्रवर्णनात विश्वप्रेम एवं भक्तिरसाची पदोपदी अभिव्यक्ती होऊन साहित्य रचनेत त्यास एक आगळेच स्थान प्राप्त होत असते व विश्वजीवानाचा परम आनंद प्राप्त करण्यास इतरांसही ते प्रेरक होते.

मागे श्री मार्डीकरांना नवंबुद्ध अवतार भगवान श्री मायानंद चैतन्य यांचे जीवनचरित्र लिहिण्याची प्रेरणा होऊन अल्पावधीतच हिंदी भाषेत तो चरित्रग्रंथ लिहून त्यांनी पूर्ण केला व तो १९५२ मध्ये प्रकाशित झालाच आहे. श्री मायानान्दांचा प्रत्यक्ष संबंध आला नसता, त्यांनी वर्तमांयुगी आविष्कृत केलेली दिव्यदृष्टी परंपरेने श्री डॉ.संतांकडून १९४८ च्या सुमारास श्री मार्डीकरांना प्राप्त झाल्यावर विश्वहीतार्थ ग्रंथादी लेखनाद्वारे विज्ञान क्षेत्रात प्रचंड गतीने पदार्पण करून ह्यांनी स्वतःचे अद्वितीय विभूती तत्व स्वयं प्रस्थापित केले आहे. १९५० मध्ये Divine Vision, १९५१ मध्ये गीतायण , १९५२ - भगवानाचे चरित्र , मराठी व हिंदीत बहुविध पथ्य काव्य रचना ती वेगळीच. अशी त्यांची कार्याची विलक्षण झेप आहे. भगवंताच्या व्यापक विश्वचरित्राचे परिपूर्णतेचा साक्षात्कार त्यांना आता आपले सद्गुरुस्थान श्री सर्वांगानंद चैतन्य यांचे द्वारा झाल्याने , भगवंताचे चरित्रलेखनात शेष राहिलेली त्यांची अतृप्तता या चरित्रग्रंथात तृप्त होणे हा ईश्वरी संकेतच म्हणावा लागेल.

श्री मार्डीकर यांची अर्धांगिनी सौ चंद्रिकादेवी यांना पण श्री डॉ संतांकडून , १९४८ मध्येच दिव्याचक्शुचा अनुग्रह (श्री मार्डीकरंबरोबरच ) झाला, तेव्हापासून त्या भगवत्कार्यात आपले पतीस सर्वोतोपरी साहाय्य करीत आल्या आहेत. अर्थात त्यांची प्रेरणापण ह्या चरित्रग्रंथ लेखनात संमिलीत आहेच. वर्तमानकाळी भगवतसेवेत अनन्य भावाने असा रत झालेला पुरुष -प्रकृर्ती (दिनकर-चंद्रिका ) योग क्वचितच दृष्टोत्पत्तीस येतो.
भक्तिरसाची गंगा वाही , पावन होती घट l
विश्वप्रेम हे दुथडी वाहे, अमर ज्योती प्रगट  ll
मानव जीवन सुखी कराया , प्रभू हो अवतरला l  
दिव्य दृष्टीचा शंख फुंकुनी , दिव्य नाद केला  ll 
ऐका ऐका सर्व विश्वजन , प्रभूचा संदेश  l 
कृतार्थ जीवन प्राप्त होऊनी , हरण होती क्लेश ll    

विश्वप्रकृर्तीचक्राचे नियमानुसार वर्तमान कलियुगाचा लय होऊन आगामी काळात सतयुगाची अभिव्यक्ती होणार आहे. तन्निमित्त गीतेतील , 'यदा यदा हि धर्मस्य ...' ह्या संकल्पानुसार भगवन मायानंद चैतन्य ह्यांचे अवतरण होऊन त्यांनी कालगतीत लुप्त झालेला दिव्यचक्षुयोग पुनश्च आविष्कृत करून युगक्रांतीचे हे बीज भारत देशात सर्वत्र पेरले आहे. ही प्रवाहित झालेली अनुभावगंगा परंपरेने श्री डॉ.संत यांच्यात १९४३ मध्ये प्रविष्ट होऊन त्यांचे दिव्य विभूतीत्व तत्काल जागृत झाले व अल्पावधीतच त्यांनी विज्ञान क्षेत्रात स्वस्थान ग्रहण केले . अशा अनेक जन्मासंसिद्धीवान दिव्यचक्षुमधे स्ठीतीप्राप्त महापुरुषाचे जीवन चरित्र विज्ञानी भक्तजनांस निःसंशय मार्गदर्शक तथा स्फूर्तीदायक व इतरांसही भगवदसिद्धांत ग्रहण करण्यास प्रेरक होईल.



अशा पुरुषाचे दृश्य चरित्र सदैव विश्वैक्यात्मभावास परीलाक्षित करून असते, हे स्वयं श्री सर्वान्गानन्द्जींच्यावर उद्घृत केलेल्या पत्राच्या उतार्यावरून स्पष्टच होते व धर्मासंस्थापनेस मुलभूत असलेली ही भगवदकार्य भूमिकाच आहे. अर्थात ह्या चरित्रग्रंथात अनुभव एवं सिद्धान्तनिरुपण जरी नसले तरी चरित्रनायकाच्या अनुभवप्रेरित विश्वजीवानाच्या प्रवासाशी समरस झालेल्या लेखकाचे हृदगतसुद्धा अमरजीवनरसाने परिपूर्ण होऊन त्याचीच पखरण सर्व चरित्रग्रंथात व्यक्त होणे ही लेखकाच्या निज आत्मसाक्षात्काराची सिद्धीच होय - गुरुशिष्य भावाची विलयावस्था येवून विश्वरूप सदगुरुत व्यष्टीभावाची आत्माहुती एवं आत्मसमर्पण ते हेच. हा अत्यंत हृद्य प्रसंग आहे.

या अनुपम भक्तीरसगाथेत या स्वल्पलेखनाद्वारे मला श्री मार्डीकरांनी सहभागी केले आहे, हे मी स्वतःचे महत्भाग्य समजतो.

विज्ञानी भक्तजन य चरित्रग्रंथाचे सहृदयतेने स्वागत करतीलच व इतरजन पण यापासून अवश्य प्रेरणा घेऊन भगवंताचे धर्मस्थापना कार्यात उत्ततोत्तर सहभागी होऊन आत्मकल्याण तथा विश्वकल्याण साधण्यास प्रवृत्त होतील अशी माझी निश्चित धारणा आहे.

औरंगाबाद
दिनांक :०६-०२-१९६८

(क्रमशः )

No comments:

Post a Comment