Wednesday 16 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १४ ..

उदार कल्पतरू
विज्ञान कार्य प्रसार

लेखक:- दिनकर यादवराव मार्डीकर

      सतगुरू निजानंद चैतन्य यांचे पार्थिव शरीर अष्टधा प्रकृतीत विलीन झाल्यामुळे डॉ संतांना अपरिमित मानस वेदना झाल्या व काही काळपर्यंत ते उदासीन व संथ असत. परंतु या त्यांच्या दशेत सद्गुरू ज्ञान प्रकाशामुळे लौकरच  परिवर्तन होऊन ते आपले वर्ण कर्म करण्यास प्रवृत्त झाले. 
       बिलासपूरच्या डॉ संतांच्या वास्तव्यात तेथे त्यांनी भगवान मायानंद चैतन्यांनी स्थापित केलेल्या विश्वधर्म प्रचाराचे भरीव कार्य केले. स्वराच्या नंदस्वामी विज्ञान शाळेचे संचालक असताना त्याच्या मदतीला ते दोन वेळा प्रचारार्थ गेले होते.  स्थापन झालेल्या एस.बी.आर कॉलेज मध्ये व सार्वजनिक रित्या त्यांची अनेक प्रभावी  प्रवचने झाली. मुंगेलीलाही त्यांच्या मदतीने श्री प्र.वि.भागवत यांच्या संचालकत्वाखाली विज्ञाननौका कार्यालय स्थापन झाले , व तेथे अनेक प्रभावी प्रचारक निर्माण झाले. त्यांच्यापैकी श्री रामलाल सोनी, श्री त्रिवेदी , श्री बटुकलाल इत्यादी हे प्रमुख होते. श्री स्वराज्यानंद ब्रह्मीभूत झाल्यानंतर द्वितीय संचालक श्री आनंद चैतन्यही बिलासपुरास आले असतांना बरेच मोठे प्रचार कार्य झाले.
      डॉ संतांच्या सामाजिक कार्याच्या बहुविध क्षेत्रातील प्रेमामुळे ते तेथील एस.बी.आर कॉलेज च्या गव्हर्निंग बॉडी चे उपसभापती होऊन त्यांनी येथेही लोककल्याणकारी लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे ज.गु.आनंद चैतन्य ह्यांच्या प्रचारकार्यास अधिकाधिक आधुनिक शिक्षित वर्गाची सहानुभूती मिळाली होती. डॉ आनंद चैतन्याच्या संशोधित, " आद्य गीता" च्या प्रकाशनासाठी डॉ संतांच्या प्रयत्नांनी तेथील श्रीमंत व्यापारी श्री किसनलाल चतुर्वेदी यांनी बरीच आर्थिक मदत स्वखुशीने केली. त्यांचा , "आद्य भारत" ग्रंथ प्रकाशनार्थ डॉ संतांच्या एक मित्र डॉक्टरांनी एक हजार रुपयांची देणगी आनंदाने दिली. डॉ संतांच्या इतर क्षेत्रातील बहुरंगी यशस्वी कर्तबगारीचा सक्रिय वाटा व त्यांनी प्रविष्ट केलेल्या विश्वधर्म प्रचाराच्या करायासही ठोस रीतीने मिळू लागला. त्यांचे हे कार्य इ. स. १९५६ मध्ये जेव्हा विज्ञान शाळेचे संचालक श्री डॉ आनंद चैतन्य ब्रह्मीभूत झाले तेव्हा त्यांनी आपल्या मृत्युपत्रात , विज्ञानशाळा ओंकारमांधाता येथील केंद्रीय संस्थेचे संचालकत्वाचे महत्वपूर्ण कार्य करावे असे लिहून माहे मे १९५६ मध्ये ते पंचमढी मध्यप्रांत येथे ब्रह्मीभूत झाले.

(क्रमशः)  

No comments:

Post a Comment