Friday 11 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १३ ..

उदार कल्पतरू
सद्गुरुप्राप्ती

लेखक दिनकर यादवराव मार्डीकर

      डॉ संत हे विभूतींच्या श्रेणी मध्ये येतात असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही . त्यांचे अंगी प्रसंगयुक्त अनेक गुण होते. ते नेहेमी सार्वजनिक कार्यात अग्रेसर होऊन भाग घेत असत व आपली जबाबदारी अति कौशल्याने अविश्रांत श्रम करून पार पाडत असत. वक्तृत्व कलेवर त्यांचे प्रभुत्व होते. बिलासपूरच्या सार्वजनिक गणेश उत्सवात जेव्हा अनेक विषयांवर परिसंवाद घडून येत, त्यात पूर्वपक्ष व उत्तर पक्षीय वक्ते म्हणून भाग घेण्याचा आग्रह मंडळींतर्फे होत असे. ह्याचे कारण म्हणजे कलाप्रवीण बुद्धीचातुर्य व कर्म कौशल्य . त्यांच्या खाजगी जीवनात ते जसे कट्टर मातृ व पितृ भक्त असत तसेच ते ईश्वरभक्तही होते. पण वादविवादासाठी ते मुद्दामच नास्तिकवादाचे समर्थन करणाऱ्या पक्षात भाग घेत असत. ह्या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण हेच, कि त्यांच्या सार्वजनिक वादविवादात वास्तविक मताचे समर्थन करण्याच्या प्रथेमुळे , इ.स . १९४३ मध्ये पुढे अशी घटना घडली  कि जी मुळे त्यांच्या भावी आयुष्याला एक अगदीच निराळे वळण लागले.
      ती इ स १९४३ ची घटना पुढील प्रमाणे -
ईश्वराच्या अस्तित्ववादाबद्दल नेहेमी बाजू मांडून भाग घेणारे डॉ संतांचे एक मित्र होते - त्यांचे नाव ब्रजभूषण सिरोटीया असे होते. ते एके दिवशी संतांकडे त्यांना प्रवचनाचे निमंत्रण देण्यास आले व त्यांना महामहोपाध्याय बी.जगन्नाथ यांचे घरी येण्यास आग्रह करू लागले. कारण हे प्रवचनकार ब्रजभूषणचे मित्र होते, तसेच कुशल वक्तेदेखील होते. डॉ संत हे जरी पूर्ण आस्तिक्यवादी होते, आणि ते ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध, रामायण, भागवत, वेदांत इत्यादींचा नेहेमी सूक्ष्म अभ्यास करत असत, तरीपण धार्मिकतेचे प्रदर्शन आपल्या आचरणात करण्याचा त्यांना अत्यंत तिरस्कार वाटत असे.
      डॉ संतांच्या मातोश्री ह्या फारच धर्मनिष्ठ असल्यामुळे , गजानन महाराज , मोरगावकर बोवा, नारायण महाराज, केडगावकर उपासनी महाराज इत्यादी प्रख्यात साधुसंतांशी त्यांचा घनिष्ठ परिचय झालेला असे. परंतु, हेसर्व होत असतांना देखील डॉ संतांची निष्ठा , अध्यात्मिक विषयांची अभ्यासू पण साधुसंतांच्या संगतीत रमत नसे. श्री सिरोटियांना डॉ संतांनी उत्तर दिले की, अशी अनेक प्रवचने त्यांनी ऐकलेली आहेत. रोगी लोकांची सेवा टाकून असल्या प्रवचनश्रवणात काळक्षेपण करणे व्यर्थ ठरेल. ते योग्य नाही. म्हणून त्यांनी येण्याचे नाकबूल केले.
      यावर श्री सिरोटीया पुन्हा म्हणाले की, हे मामुली प्रवचन नसून , माझे मित्र तुम्हाला व इतरांना प्रत्यक्ष व यथार्थ परमेश्वराचे दर्शन घडवतील. हे ऐकून, डॉ संतांनी त्यांची खूपच थट्टा केली. परंतू श्री सिरोटीया जेव्हा आपला आग्रह सोडेना तेव्हा डॉ संत नाईलाजास्तव प्रवचनास गेले. हे प्रवचनकार म्हणजे, श्री तुलशंकर पाठक (निजानंद चैतन्य ) होत.
      प्रवचनात गावातील ३० किंवा ३५ प्रमुख निमंत्रित शिष्ठ सज्जन हजर होते. श्री तुलशंकर पाठक यांनी बत्तासे ठेऊन अधिष्ठानाची मांडणी केली. श्री कृष्णाने अर्जुनास दिव्यचक्षु कसे दिले ह्याची प्रायोगिक प्रक्रिया थोडक्यात समजावून दिली. प्रवचनानंतर सर्व श्रोते आपापल्या घरी निघून गेले होते. परंतु डॉ संत तिथेच बसून राहिले. त्यांचा व श्री तुलशंकर पाठक यांचा खालील प्रमाणे अल्पसंवाद झाला तो असा -
डॉ संत - महाशय, मै आपको ३ प्रश्न पूछना चाहता हूं , क्या आप उनका उत्तर दे सकेंगे ?
श्री पाठक - हां , जरूर पुछीये . मै कोशिश करके आपके सब प्रश्नो का जवाब दूगा.
डॉ संत - आपका प्रवचन सुनकर मुझे ऐसा कूछ स्वानुभव हुआ है कि , असे शब्दो में आपको बताने में मुझे बहोत कठीनाई प्रतीत हो राही हैं l परंतु मेरे शंकाओ का समाधान हुए बिना मुझे चैन नहीं मिलेगा l
 श्री पाठक - डॉक्टरजी आप अपनी सब शंकाए प्रगट कर शकते है l ठिक है ; आपके ३ प्रश्न कौनसे है , काहीये l
डॉ संत -" आपका प्रवचन प्रयोग के साथ मैने सुना , जो कूछ मैने आजतक परमात्मा के विषय में पढा या सुना था , वह सब उलथ पुलथ हो गया है l परमात्मा को पाने के लिये मैने जो कुछ परंपरागत तथा सुने हुए प्रयत्न किये थे, वे सब निरर्थक , कष्टप्रद तथा अविश्वसनीय हुए ऐसा मालूम पडता है l परंतु अभि जो आपने स्वानुभव प्रदान किया , उससे मुझे यह प्रतीत होता है , कि इस विश्व में परमात्मा नाम की कोई अन्य वस्तू न होकर सर्वत्र मै हि मै ओतप्रोत भरा हुआ हूं l सिवा मेरे अन्य जड तथा चैतन्य वस्तू कोई भी नहीं है l अब यह बताईए , की यह मेरा अनुभव आजतक हुए महात्माओने परंपरागत स्वीकृत अनुभवोसे कितना निराला और विलक्षण हैं l तो फिर निवेदन किजिये कि क्या सचमुचही मेरा अनुभव यथार्थ है, या मुझे कुछ भ्रम तो हुआ नहीं l "
      ह्या वेळी सभागृहात फक्त श्री पाठक व डॉ संत हे दोघेच होते l त्यांच्या शिवाय तिथे कोणीच नव्हते व ते दोघे हि जवळ जवळ मांडी घालून बसले होते.
श्री पाठक - " डॉ संतजी आपका यह स्वानुभव बिलकुल ठीक है l वह भ्रम नहीं , आप ऐसे सच मानिये  l यह आपकी प्रतितीही परमात्मा के बारे में अतिउच्च और सत्य साक्षात्कार है l "
      हे उत्तर ऐकून डॉ संत मनावस्थेच्या उच्च स्तरात इतके तल्लीन झाले कि, त्यांना कशाचेच भान राहिले नाही. या अवस्थेस तुर्या, उन्मनी वगैरे काय म्हणावे हे , त्यांचे त्यांना समजेनाl अशा अवस्थेत किती काळ गेला , कोणास माहित पण त्यांना श्री पाठकजींना देहभानावर आणावे लागले l
श्री पाठक -  (डॉ संत ची मांडी हलवून म्हणतात ) " डॉक्टरसाहेब आपके दो प्रश्न अथवा शंकाये कौनसी हैं पुछीये."
 डॉ संत - "हमारे अब कोई प्रश्न बाकी नहीं है और शंका भी नहीं है l" असे म्हणून डॉ संत अतिहर्षानें गदगदीत होऊन पाठकजीच्या चरणी दंडवत करून हुंदके देऊन रडू लागले.
 श्री पाठक - "डॉक्टरजी , आपको क्या कष्ट हो रहा है ?"
डॉ संत - "कष्ट तो इस बात का है कि , हिसके पूर्व का मेरा सब जीवन व्यर्थ गया इष्क दुःख हो राहा है l यादी जो वस्तू आपने मुझे प्रदान की वह कुछ वर्ष पूर्व मुझे प्राप्त होती तो मैं इस हीन संशय सागर में डुबकीया लागाते न रहेताl "
 श्री पाठक -"अब यह खेद करना अयोग्य है । किस समय क्या होगा कोई नहीं जानता ।सब होनहार ईश्वर प्रेरित और नियमित है । सब घटनाये योगायोग के स्वाधीन है । हो सकता है कि आपके जीवन का यह प्रसंग आपके पूर्बसंचित और तपश्चर्या का फल हो । मेरा याही आपको आशीर्वाद है की इस स्वानुभव में आप सदा के लिये स्थित राहे ।"
      तेव्हापासून जन्मजन्मांतरांपासूनचे हरपलेले निजस्वरूपाचे निजधन सापडलेल्या परमानंदाच्या स्थितीत राहून डॉ संत आपले सर्व कौटुंबिक , सामाजिक व जागतिक व्यवहारात सहज समाधीच्या स्थितीत वागू लागले.
      डॉ संतांचे सद्गुरू श्री तुलाशंकर पाठक उपाख्य श्री निजानंद चैतन्य हे पृवीचे मध्यप्रदेशातील सागर शहराचे रहिवासी होते. आंग्लभाषा विभूषित बी.एस.सी पदवीधर होते. यांचा असाच  परिचय स्वामी श्री स्वराज्यानंदाशी अनेक वर्षांपूर्वी झाला होता. तो प्रसंग देखील सर्वांगयोग युक्त प्रायोगिक प्रक्रियेच्या प्रवचनाचा होता.
भगवान मायानंद चैतन्य प्रस्थापित विज्ञानशाला ओंकारमांधाता येथे , श्री पाठक ६ महिने राहिले होते. व नित्य श्री स्वराज्यनिंदाशी या विषयांची चर्चा होत असे.
      म्हंणून हा विषय त्यांनी इतका आत्मसात केला होता., कि त्यांनी सर्व सांसारिक महत्वाकांक्षांना तिलांजली देऊन, ते भगवान श्री मायानंद चैतन्याच्या औप धर्म म्हणजे विश्वधर्माचे स्वयंसिद्ध व एकनिष्ठ प्रचारक बनले. ते बिलासपूर कटनी रेल्वे मार्गावर असलेल्या शहडोल या गावी राहत असत.
उदरपोषणार्थ त्यांनी या गावी एक ऑइल मिल चालवली होती. व याच मिळकतीवर ते आपला निर्वाह करीत असत. त्यानिमित्ताने ते मधून मधून बिलासपूरी येत असत आणि, शक्य असेल तेव्हा विश्वधर्म प्रचाराचे कार्य करीत असत. अश्या रीतीने त्यांचा व डॉ संतांचा दृढ परिचय झाला व, डॉ संत ह्यांना श्री निजानंदचैतन्य सारख्या सद्गुरूच्या कृपेने दिव्याचाचक्षु बोधामृत प्राप्त होऊन ते देखील श्री मायानंद चैतन्य प्रणित विश्वधर्माचे कट्टर अनुयायी बनले.
      बिलासपुरात त्यांनी विज्ञान नौका कार्यालय स्थापून , आपला सांसारिक व्याप सांभाळून अनेक अनुयायी बनवले भगवान मायानंद चैतन्यांनी दिलेल्या अनेक औषधर्म प्रकाशक ग्रंथ मिळवून त्यांनी सूक्ष्म अभ्यास लगेच सुरु केला. दरवर्षीच्या बुद्धजयंतीच्या विज्ञान संम्लेअनास र्व ओंकारमांधाता येथे हि जाऊ लागलं.ए तिथे त्यांनी, संचालक स्वराज्यानंद व अनेक प्रमुख विज्ञान जणांशी परिचय करून घेतला.
      श्री निजानंद चैतन्य मात्र आपल्या पर्या शिष्याचे (डॉ संत) हे परमसुख व कौतुक पाहावयास जास्त दिवस जिवंत राहिले नाहीत. त्यांना एक बिमारी होती.. ती, पुढे विज्ञान प्रचाराच्या परिश्रमामुळे वाढत गेली. म्हंणून त्यांना उपचारासाठी मुंबईत के. ई. एम रुग्णालयात जावे लागले. तेथील प्रख्यात सज्जन डॉ फडके हे, निजानंद चैतन्याचे ऑपेरेशन करणार होते. परंतु ऑपेरेशन होण्या पूर्वीच त्यांचा आजार वाढला व त्यांचे शरीर अष्टधा प्रकृतीतीत विलीन झाले.  यापूर्वी,त्यांनी डॉ संतांना एक महत्वपूर्ण पात्र लिहिले होते, जे कि विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. त्यावरून त्यांचा व डॉ संतांचाही अध्यात्म क्षेत्रातील अधिकार किती उच्च प्रतीचा होते ह्याचे स्पष्टीकरण होते.

(क्रमशः )

No comments:

Post a Comment