Friday 19 August 2016

!! बदल !!

      " ए ताई , अग बदल ना ग ते रटाळ सिरिअल !! किती गुंतली आहेस त्यात , उगीचच काहीही पहात असतेस नि खरं मानून जगतेस !!" सुदीपचा आवाज आता चढला होता. भानावर येत सुमा ने channel बदलले आणि आपल्या कामात परत दंग झाली. आता TVवर गाणी लागली होती, आवडीचे बोल कानावर पडताच , सुमा परत त्या चालीन्वर गुणगुणायला लागली आणि घरात छानसे वातावरण निर्माण  झाले. !
      म्हणजे पहा !! फक्त एक बटण दाबल्याने माणसाचा "मूड" लग्गेच बदलतो ! इतका सहज बदल जीवनात घडला तर किती छान होईल न!!

      " बदल - change - परिवर्तन - क्रांती  "

      आज प्रत्येक बाबतीत आपल्याला बदल पाहिजेच आहे - त्याच त्या वातावरणातून / मनःस्थितीतून / कामातून / दैनंदिनी मध्ये / कपड्यामध्ये / अभ्यासात --- हरेक गोष्टीत बदल पाहिजेच !!! का ?? - तर फ्रेश वाटावं - ताजेतवाने वाटावे - थोडास हटके वाटाव - मनःस्थिती बदलावी म्हंणून .
     हेच पहा न आता ह्या "बदलाची" रूपे !!
लहान मुल जसजस वाढायला लागतं तसे त्यांच्यात अनेक बदल जाणवायला लागतात आणि मुख्य म्हणजे ह्या प्रत्येक बदलाचे कौतुक असते ! विशेषतः घरातली आजी -आजोबा झालेली जोडपी खूपच कौतुक करतात आणि "ह्या गोड कौतुकात आपल्या मुलांच्या लहानपणीचे क्षण आठवून त्यात रमून जातात." घरातल्या खेळकर हसर्या वातावरणाचे मुख्य कारण - हीच लहान बाळे असतात! म्हणजे अनेक वेळा आपण ऐकतोसुद्धा कि , " पाळणा हालला आणि आमच्या घरातले वातावरणच पार बदलून गेले "!!
      मुलांचे वय वाढत जाते तसे आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे त्यांच्यातही बदल होत जातात आणि त्यांच्यातल्या ह्या विविध बदलांमुळे परिवारातील / घरातल्या इतर मंडळींवर अनेक बदल घडत जातात. मुल बाहेर पडायला लागतात. शाळा, कॉलेज, नौकरी मध्ये विविध वृतींच्या सहवासात येतात आणि ह्यामुळे देखील आपल्याला मुलांच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवू लागतात. काही चांगलेच असतात, पण कधी कधी काही वाईट बदलही घडतात ज्यांना बदलता बदलता आपल्याला नाकी नऊ येतात !! आणि हे नकोसे बदल घडवताना मुलांच्या मनाची तर खूपच काळजी घ्यावीच लागते. कधी कधी अनपेक्षितपणे काही बदल असे समोर येतात कि , खरच आश्चर्य वाटतं....."एवढ्या लहान वयातल्या मनावर ह्या लाखो बदलांचे किती परिणाम होत असतील !!आणि प्रत्येकातून जाण्यास मन बदलू नये म्हंणून हृदयाला किती प्रयास करावे लागत असतील !!
      खोडकरपणा फारच वाढला कि शाळेतही वर्ग बदलावे लागतात , कारण त्यामुळे इतर मुलांवर त्याचा नकळत परिणाम होऊ नये . घरचे कपडे वेगळे, शाळेतले रोजचे uniform वेगळे नि स्पोर्ट्स डे वगैरे special periods साठी चे वेगळे कपडे - तेही सतत बदलावेच लागतात !! आणि ह्यातही गम्मत असतेच की!! बघा -- uniform मध्ये असतांना शिक्षकसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना पटकन ओळखतात , पण एरव्ही बाहेर कुठे भेटले तर लक्षातच येत नाहीत त्यांना "आपलीच मुले"!!
      तोच तो अभ्यास नको म्हणून PT चित्रकला सारखे विषयसुद्धा शाळेत शिकवले जातात, ज्यातून विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून बौद्धिक व शारीरिक वाढीस मदतच होते. आणि लहान वयात मूड्स सतत बदलत असतात , ह्या मुलांचे !! हे मूड्स सांभाळता सांभाळता पालकांची पळताभुई थोडी होते !! शिवाय ह्यांची मित्र मंडळी सुद्धा ह्याच वयात बदलते ! फरमाईश / मागण्या बदलत राहतात ..."मग त्याने अस घेतल , ते माझ्यापेक्षा चांगलच आहे , मलापण तेच पाहिजे ...!" कि झाल ...घरातल वातावरण बदललं !!! आजी आजोबा समजावण्यात गर्क , ताई दादा चिडवण्यात आणि आई बाबाच्या  कपाळावर चिंतेच्या आठ्या !! "आण्याची कुठून हि वस्तू - जी आपल्या देशातच उपलब्ध नाहीये !!!!!!!"
      असे हे बालपणाचे - मस्ती हट्टीपणात गेलेले दिवस मात्र परत कध्धीच येत नाहीत , हेही तितकेच खरे !
वय वाढल कि मुलांच्या सवयी , विचारशक्ती, बौद्धिक पातळी --सर्वच बदलत जातं. मुलं जबाबदारीने वागायला लागतात . काही शारीरिक बदलदेखील होत असतात, आणि एकूणच ह्या सर्व परिवर्तनाला मुले हिमतीने सामोरे जातात !
      त्यातही घरातच वेगवेगळ्या field / faculty मधले लोक असले कि त्यांच्या वर्तणुकीचासुद्धा मुलांवर अनेक प्रकारे परिणाम करतात , नि तसेच बदल त्यांच्यात दिसायला लागतात. जसे - सुरुवातीला कदाचित मुलांमध्ये गायकी ,नृत्य ,वाचन ,चित्रकला ,खेळ ,क्रीडा ... विविध क्षेत्रे जसे समाजकार्य ,राजकारण इत्यादी मिळते.., "असच करावसं वाटत ... काही मुद्दाम ठरवून केलेलं नाहीये ..."
      समोरच्या व्यक्तीचे हावभावसुद्धा आपल्या वागण्यात परिवर्तन आणतात. वाढत्या वयातल्या शारीरिक व मानसिक परीवार्तानांमुळे तर मुलांवर, विशेषतः ह्या तरुण पिढीला फारच जपावे लागते, कारण आता त्यांच्या स्वतःच्या वैचारिक पातळींवर अनेक बदल घडत असतात !सभोवतालच्या परिस्थितीशी जास्तीत जास्त जुळवून घेण्याचा प्रयास करता करता अनेक मानसिक परिवर्तन दिसायला लागतात. जसे - घरात अचानक काही निर्णय जबाबदारीने घ्यायला लागतात, घरगुती समस्यांवर आपले मत प्रदर्शन करतात, आणि हळूहळू बाहेरील वातावरणातसुद्धा रमायला लागतात. हिरीरीने सहभागी होतात.
      आणि ह्यातूनच त्यांच्या भविष्याच्या योजना बनायला सुरुवात होते ....

( क्रमशः)              

No comments:

Post a Comment