Thursday 11 August 2016

.....श्रीमती सुनीला यशवंत संत ....भाग ३

      

"आमच्या सासूबाई "

श्रीमती सुनीला यशवंत संत 

भाग ३ ...

      त्यातही सुनांचे कौतुक जरा जास्तच !! मला तर सुरुवातीला नीट स्वयंपाकदेखील येत नव्हता. माझ्या आईने पुष्कळ प्रयत्न केले होते सर्व शिकवण्याचे , पण मलाच तितकासा रस नव्हताच ह्या गोष्टीत.  आणि इकडे आईंनी तीच जबाबदारी परत पार पाडली. मला अनेक पदार्थ बनवायला शिकवले. कालाकुसारीतला 'क' न जाणणारी मी, आज स्वतः विणकाम , भरतकाम , सिरामिक painting एम्बोसीन्ग करू शकते. त्यांनीच मला शिलाई मशिन चालवायला शिकवले.
      सांगण्याचा हेतू असा कि - काहीच येत नसतानासुद्धा त्यांनी मला " हेच येत नाही - तेच येत नाही.." असे टोमणे मारत न बसता सर्वकाही स्वताहून शिकवले.
      आजही आई आठवल्या कि फक्त त्यांच्या  स्मितहास्यतच आठवतात. सध्या त्या पुणेकर आहेत. पण, त्याना सारखे दोन्ही घरे एकत्रच रहावीत असेच वाटते. पण मग आज तशी परिस्थिती नाही. प्रत्येकाचे आपापले काम धंदे आहेत , म्हणून मग त्या स्वतःच adjust करतात. मग एक पाय पुण्यात - एक नाशकात अशी त्यांची द्विधा मनस्थिती होते.
      आजही त्यांचा फोने आला कि , राहुल मला म्हणतात , " तुझ्या मैत्रिणीचा फोने आहे" आणि हे नवीन नाते आम्ही दोघींनीही जपले आहे. त्यान्नासुद्धा मज्जा वाटते.
      माझ्या मैत्रिणी तर माझं हेवा करतात. " माझी सासू तर नाही --अशी...!!" असे बोलून मोकळ्या!! मग मीच म्हणते , " नशीब लागतं!"
       खरच नशीब लागत नाही का , अशा व्यक्तींचा सहवास आपल्याला मिळायला !!! ज्यांना फक्त ओसंडून प्रेम देणेच माहित, कोणाच्याही उणीवा काढत न बसता - त्याचा आहे तसा स्वीकार करणे. - अवघड आहे , पण माझ्या सासुबाईंनी ह्या सर्वावर मात केलीये ! ह्याचे साक्षीदार आम्ही आहोतच की !! फक्त एकच खंत राहते - आज आमचे बाबा पाहिजे होते ....
      पण दैवापुढे कुणाचेही चालत नाही हेच खरे ! आता तुम्ही म्हणाल कि , " हे तर चांगलेच सांगताय त्यांच्याबद्दल. काहीतरी कुठेतरी उणीवा असतीलच की..!!"
      पण एक सांगू ? मला तर गेल्या २८ वर्षात त्यांच्यात उणीवा काढण्यासारख काहीच दिसलच नाही, ह्या वयात सुद्धा (८० ) आपल्याकडून कोणी दुखावले जाऊ नये , आपण (मी) - माझ्यामुळे इतरांचा काही फायदा करून देऊ शकते का ? नवीन ..पुढे काय ? मी शिकेन, बाकीच्यांना शिकवेन ...त्यांच्या समवयस्क मैत्रिणीसुद्धा त्यांना म्हणतात , " कशा हो संतवहिनी तुम्ही सर्व करता ? सुनांच कौतुक ...येवढ !!!???!!!
      सध्या त्या पुण्यात आहेत ,पण तिथेही शांती नाही, त्यांच्या सोसायटीच्या entertainment commitee च्या , आई Head आहेत. गणपती उत्सवात त्याच सर्व आखणी - मांडणी इतरांच्या सहाय्याने करतात मग त्यात - लहानमोठ्यांसाठी खेळ , entertainment programs, - ह्यासर्वांसाठी लागणारी वर्गणी बक्षिसं {इतर मेम्बेर्स आहेत मदतीला - पण प्रत्येकाला मदत लागते आईन्चीच !!} सोसायटीतल्या बायकांना एकत्र आणून मासिक 'भिशी' सुरु केली. पण त्यात इकडच्या तिकडच्या गप्पा - नवीन कोण काय शिकू शकते - मग तो एखादा पाककलेच पदार्थ असो वा एखादी कलाकुसर वा एखाद्या व्यक्तीचे जीवनोपयोगी मार्गदर्शनपर छोटेसे भाषण !
      आताशा त्या जरा थकल्या आहेत , पण तरतरीत - कायम ताजेतवाने - चेहेर्यावर दुखण्याचा लवलेशही नाही . गुढघ्याच्या , पोटाच्या दुखण्यामुळे एक नवीन मैत्रीण मिळाली आहे - त्यांची काठी ! पण त्यामुळे त्यांचे फिरणे बंद झाले नाही. जमेल तेवढे करतच असतात. " बसून काय करू?" हा त्यांचा प्रश्न. आपण उत्तर दिल.." जरा आराम करा .." तर त्यावर त्यांचा प्रतिप्रश्न / उत्तर " आराम तर चालूच आहे . दुसरं काहीतरी अजून करते." आणि शिवाय गेले अनेक वर्ष त्यांचे  लहान बाळांसाठी sweater सेटचे (sweater मोजे टोपी ) विणकाम आजही सुरूच आहे. काही sweaters त्या गिफ्ट म्हणून देतात, तर काही आमच्या सद्गुरू डॉक्टर अनिरुद्ध (बापू) जोशीच्या "माये ची ऊब " च्या कलामांतर्गत दान करतात.
      नातवंडाचे भारी कौतुक. नेहेमी नवीन काही बाजारात दिसल, कि ह्या आधी आपल्या नातवंडाना देणार . प्रत्येक वस्तू २-२ च्या हिशोबाने - २ नाती - २ नातू अशी वस्तू घेणार, तिचे महत्व सांगणार आणि "परत हरवले तर देणार नाही " हेसुद्धा सांगणार आणि खरोखरच मुलांनी ते हरवले / तोडले तर त्या, त्यांनासुद्धा शिक्षा करतात. हे सारे असते ते , त्यांना वस्तूंची किंमत / महत्व कळावे म्हणून.
      आमच्याकडे गणपती - गौरी आणि अश्विन नवरात्र हे दोन सण असतात. ह्यातही चौघा नातवंडांना हाताशी घेऊन त्यांना प्रत्येक काम शिकवतात. अगदी दरवर्षी तेच काम असते पण त्याचे महत्व लक्षात राहावे म्हणून दरवेळी वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचा अर्थ समजावून सांगून करवून घेतात - मग काय चौघेही आनंदाने तयार!
कुठे गावाला जातांना , न चुकता तिथल्या नातेवाइकासाठी आवर्जून काहीतरी भेटवस्तू घेऊन जातातच आणि मुख्य म्हणजे ज्यांना देतात त्यांना तर फार आवडतातदेखील.
      आजच्या नवीन technology सुद्धा त्या शिकल्या आहेत. कॉम्पुटर वर जमेल तेव्हा नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न सुरूच असतो. आणि सुमा ने तिच्या नौकरी निमित्त लाडक्या सूनुआज्जीला मोबाईल भेट दिला आहे. त्यावर आज त्या आम्हा सर्वांशी whatsapp द्वारे सुद्धा गप्पा मारतात.
      आम्हा सर्वांचा वाढदिवस - लग्नाचा / व्यक्तिगत ह्यांच्या लक्षात. प्रत्येकाला काही न काहीतरी देणारच. " आई , कशाला आता " असे म्हणले कि म्हणतात, " राहू दे ग, माझी आठवण. जास्त काही करू शकत नाही, " आम्ही जर दूर असलो , प्रत्यक्ष भेटीत आठवणीने " हे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट " असे सांगून देणारच . त्यांच्या मित्र-मैत्रिणींना न विसरता शुभेच्छाचा फोने करणार, आणि तेसुद्धा आतुरतेने संतवहिनींच्या फोने ची वाट पाहत असतात.
      आम्हा सुनांना तर कधी जाणवूच दिल नाही कि, त्या आमच्या सासू आहेत. कायम आईच्याच मायेने वागवलं. आणि खरोखर त्या जवळ असल्या कि आईची कमी जाणवतच नाही, त्यांना त्यांची मुलं जवळ पाहिजे असतात. म्हणजे मोकळेपणाने गप्पा मारता येतात. कोण कुठे काय करतय याची सर्व तपशील असते.
      " जुन्या-नव्या पिढीत त्यांनी स्वतःला समावून घेतलंय. इतरांनी आपल्याशीच तडजोड करायची  का ?आपणच जरा व्यवस्थित वागलो /राहिलो तर आत्ताचा जो generation gap वर ओरडा -आरडा , ही तफावत जी जाणवते दोन पिढ्यांमध्ये - ती जाणवणारच नाही " ही त्यांची समजूत. फक्त वरवर नाही ,तर त्या स्वतः त्याप्रमाणे जगल्यादेखील आहेत.
      त्यांनासुद्धा कुणी सासू आपल्या सुनेशी नीट वागत नसेल तर वाईट वाटते. "सासुपणाचा हेका कशासाठी ? हे त्यांना कळत नाही.
      मी आणि नीता - ह्या त्यांच्या पोटच्या मुली नाही तर सुना आहोत, - पण आज त्यांच्यासमोर आम्ही सांगू इच्छीतो कि , "त्या आमच्या सासू या नात्याने आमच्याशी कधीच वागल्या नाहीत . सदैव आमच्या आई च राहिल्या ! मैत्रीण बनून राहिल्या ! आजही मला काही अडचण असल्यास मी आधी त्यांचा सल्ला घेते. "माझ्या सासूला मी कशी विचारू ?" हा असा प्रश्न मला कधीच पडला नाही,
      आपण जगाच्या बरोबरच राहिला पाहिजे, म्हणून आम्हाला सुद्धा सतत प्रेरणा देत असतात.

      सध्या ,सासू सुन - संबंधावर जे ताशेरे ओढले जातात त्याने सुद्धा आई दुखी होतात. आणि त्याला जबाबदार आपणच आहोत हेदेखील तितक्याच सहजपणे कबूल करतात. मात्र , माझ्या सासूबाई कश्या आहेत - हे सर्वांना माहित असाव म्हणून हा लेख प्रपंच !!
      आणि प्रत्येक मुलगी कधीतरी ह्या पदावर येणारच आहे, तरी तिने स्वतःला नवीन घरात समावून कसे घ्यावे ह्यासाठी आमच्या आई - श्रीमती सुनीला संत यांचा आदर्श नक्कीच घेता येईल .. हो न ? कारण शेवटी घर जरी दोघांच असल तरी , घरातल्या स्त्रियांच्या आपसी संबंधावारच घराचे घरपण टिकून असते नाही का !!??!!
   
      तर, आता तुम्हीच सांगा - अशी सासू मिळायला भाग्यच लागत !!!!!

टीप :- हा लेख २००४ साली लिहिला आहे, पण काळानुसार त्यात काही बदल केले आहेत.

 {समाप्त} 

  

No comments:

Post a Comment