पहाट सोनेरी किरणांची
नवीन आशेची नवीन विचारांची
एक स्वतंत्र आयुष्याची
जन्म अडतो अश्या मैत्रीवाचून
गरज ही प्रत्येक जीवनाची.
मित्र हा असतो असा एक झरा
असतो ज्याकडे मनातील वसा
ज्याच्यावाचून खिडकीतून परततो
गंध न घेता, वारा.
प्रत्येक घटनेचा इतिहास तो
पाउल टाके दाही दिशा
खाचखळग्यांवरूनी लोटांगण घाली
निस्वार्थ मैत्री हीच त्याची "शिधा"
व्यक्त करण्या आपल्या भावना
नसे गरज शब्दांची
अबोल डोळ्यातूनही वाचे
गरज आपल्या आयुष्याची.
रसिका आपली कविता वाचून जीवनाच्या खळाळणार्या आनंद झर्यामागील मैत्रीचे रहस्य उकलले. अप्रतिम प्रतिभा !
ReplyDelete